Thursday, May 2, 2024
Homeनगरविहीर खचल्याने दबलेल्या तीन जणांचा मृत्यू; दोन जण जखमी

विहीर खचल्याने दबलेल्या तीन जणांचा मृत्यू; दोन जण जखमी

वैजापूर | Vaijapur

वैजापूर तालुक्यातील झोलेगाव शिवारातील परिसरात विहीर खचल्याने ढिगार्‍याखाली दबून तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

सविस्तर माहिती अशी की झोलेगाव परिसरात आसराबाई साहेबराव करंडे यांच्या शेतात महीनाभरापूर्वी नविन विहीरीचे काम चालू होते. काम चालू आसतांना दि. 03 रोजी दुपारी अडीच वाजता आचानक विहीर कोसळून तिन मजूर ठार तर दोन जखमी झाले आहेत.

सिताराम रावत वय 25 रा. राजस्थान, महाविर रावत वय(38) राजस्थान, तानाजी गुजर वय35 राजस्थान सदरील तिघे जण मयत झाले आहेत तर छोटू भिल्ल वय (25) राजस्थान आणि रत्तन सिनरावत वय (25) अशी मजुरांची नावे असून विहीरीचे काम करून आपापली उपजिवीका भागवत आसतांनाच आज काळाने घाला घातला. विहीर कोसळल्याचे कळताच शेजारी शेतात काम करत असलेल्या लोकांनी आरडाओरड सुरू केली सर्व शेजारी एकत्र झाले.

दरम्यान या दोघांना वाचविण्याकरिता दगडाच्या ढिगार्‍याखाली दबले असतांना पोकलेनच्या मदतीने दगड उपसण्याचे काम सुरू केले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर दोघा जखमींना बाहेर काढण्यात यश आले. सदरील घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांनी धाव घेऊन तात्काळ मदतकार्य सुरू केले .या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांनी भेट दिली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या