नाशिक | Nashik
स्मार्ट सिटी अंतर्गत सराफ बाजारात भुयार गटारीची कामे सुरू आहेत. परंतु पावसाळा तोंडावर आला असतांना ही कामे वेगाने करावीत अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे.
- Advertisement -
दरम्यान पावसाळ्यात सराफ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी व गाळ आलेला असतो. त्यामुळे येथील परिसरातील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुजबळ यांनी या ठिकाणी भेटही दिली होती. त्यानंतर लागलीच स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी भुयारी गटारीचे काम सुरू करण्यात आलेले आहे.
परंतु अनेक दिवसांपासून सुरू असलेले काम अद्यापही सुरूच असल्याने या कामाबाबत स्थानिक व्यापारी व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे काम उरकावे अशी मागणी स्थानिकांमधून करण्यात आली आहे.