नाशिक | प्रतिनिधी | Nashik
धरणक्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने गंगापूर धरण (Gangapur Dam) आता ९५ टक्के तर दारणा (Darna Dam) ९७ टक्के भरले आहे. नाशिकच्या धरण क्षेत्रात ९० टक्के साठा झालेला आहे. त्यामुळे आता धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
दारणातून ३,५००, नांदूरमध्यमेश्वरमधून (Nandurmadhyameshwar) ५,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज दुपारी १२ वाजेपासून गंगापूर धरणातून ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. सायंकाळी ५ वाजता १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.