जळगाव – Jalgaon
जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नांद्रा गावाच्या शिवारातील एका शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत. या घटनेमुळे शेतकरी तसेच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- Advertisement -
नांद्रा शिवारात बिबट्याचा अधिवास असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.
नांद्रा शिवारालगत जंगलाला लागूनच ताडमळा आहे. या ठिकाणी संजय रामराव पाटील यांच्या शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळले आहेत. गावातील शेतमजूर नेहमीप्रमाणे शेतात कामाला गेले होते. तेव्हा शेतात मजुरांना ही पिल्ले दिसून आली. त्यानंतर या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.