नाशिक l Nashik (प्रतिनिधी)
यावर्षी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात राहिले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागातील कांदा रोपवाटिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.
- Advertisement -
त्यामुळे कांदा उत्पादकांनी कांद्याचे बियाणे टाकून रोपवाटिका तयार करून यामध्ये अधिक वेळ खर्च करण्यापेक्षा कांदा बी पेरणीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
अनेक भागात कांदा बियाणे पेरणी करून कांदा उत्पादन घेण्यात येत आहे. यासाठी स्प्रिंकलरचा वापर होत आहे.