प्रतिनिधी l Nashik :
पावसामुळे झालेले कांदा पिकाचे नुकसान व निर्यात बंदीच्या निर्णयाचा तोटा झाल्या मुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रासला गेला आहे.
त्यामध्ये आता कांदा पिकावर नविन पिळया रोगाचा प्रादुर्भाव 50 – 60 टक्के झाला आहे.
त्यामुळे शासनाने त्वरीत पंचनामे करुन बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदिप जगताप, गोविंद पगार, राजू शिरसाठ, प्रा. किरण पाटील, शंकर फुगट यांच्या सह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.