Video : …अन् नाशिकच्या शेतकऱ्याने फिरविला पाच एकर कोबी पिकावर नांगर

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी (Farmer) वर्ग अडचणीत सापडला आहे. आज नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri) पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या कोबी पिकला केवळ १ रुपया भाव मिळत असल्याने तसेच ते पिक काढण्यासाठी काढणीचा खर्च देखील परवडत नसल्याने आपल्या ५ एकर क्षेत्रातील कोबी पिकावर ट्रॅकरच्या सहाय्याने नांगर फिरविला आहे…

पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी कोबी लागवडीसाठी प्रती एकर ५० हजार रुपये खर्च केला आहे. एकूण पाच एकर कोबी लागवडीसाठी त्यांचा २.५० लाख रुपये खर्च झाला आहे.

मात्र कोबी पिकाला केवळ १ रुपये भाव मिळत असल्याने त्यांनी आज शासनाचा निषेध नोंदवीत आपल्या ५ एकर कोबी पिकावर नांगर फिरविला आहे. तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर शेतकरी पुन्हा एकदा संपावर जातील असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

राज्यातील कांदा, द्राक्ष यासह विविध शेतमाल पिकविणारा शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. ही अतिशय दु:खाची बाब आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कसारा घाटात ‘द बर्निंग ट्रक’चा थरार

मला राज्यातील शेतकऱ्यांना सांगायचे आहे. आपण कुठल्याही परिस्थित खचून न जाता आत्महत्या करू नये. शासनाला आपली दखल घ्यावीच लागणार आहे. जर शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत केली नाही तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असे अंबादास खैरे यांनी म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *