नाशिक । Nashik
घाटनदेवी मंदिर परिसरात विसावलेला हजारो शेतकऱ्यांचा जत्था मुंबईकडे रवाना झाला आहे. कसारा घाटात शेतकऱ्यांनी जय किसान, जय संविधान चा नारा देत परिसर एकसंघ केला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या पंजाबच्या शेतक-यांना पाठींबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान काल सायंकाळी घाटनदेवी परिसरात मुक्काम करीत आज सकाळच्या सुमारास शेतकऱ्यांनी मुंबईकडे कूच केली.