भुसावळ : Bhusaval
गेल्या तीन-चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहेत. तापी नदी उगमस्थानावर होत असलेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आला असून पाण्याचा वाढता प्रवाह बघता हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत.
- Advertisement -
Video लांडोर बंगला येथील धबधब्याची पर्यटकांना भुरळ
यामुळे धरणातून २४ हजार ५०९ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, तापी नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.