औरंगाबाद – Aurangabad
येथे काल दि.14 रोजी उस्मानपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक घटना घडली होती, लॉक डाऊन लागू असतांना, सलूनचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असता, एका सलून चालकाने आपले दुकान चोरून चालू ठेवले होते. उस्मानपुरा पोलीस त्या ठिकाणी गेले असता, त्या सलून चालकाला समजून सांगत असतानेच त्या सलून चालकाला चक्कर येऊन तो जागेवर कोसळून त्याचा मृत्यू झाला.
या घटनेत मीडिया कडून मृताच्या नातेवाईका कडून पोलिसांवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे.