जळगाव – यावल Jalgaon Yaval
जिल्ह्यातील किनगाव येथे पपईने भरलेल्या आयशरच्या अपघातात १५ जणांनी जिव गमवला. याप्रकरणाची दखल थेट पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी घेतली असून शासनाने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. अपघात घडला त्याठिकाणाची पाहणी करण्यासाठी नाशिक विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर आले असून त्यांनी घटनेची माहिती घेऊन चौकशीचे आदेश दिले व संबंदीत व्यापारी, टेम्पोचालक यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.