मुंबई | Mumbai –
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानेे सुरु असलेल्या वादात आता रिपाइचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही
- Advertisement -
उडी घेतली आहे. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि इतर नेत्यांनीही मुंबई ही मराठी माणसाचीच आहे हे मान्य नसेल त्यांनी बाप दाखवावा अशा शब्दांत कंगनावर हल्लाबोल केला आहे. तर रामदास आठवले यांनी या वादात ट्विट करुन सत्तेत असलेल्या शिवसेनेने धमकी देणं योग्य नसल्याचं म्हटले आहे.
लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. कंगनाला आपलं मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. कंगनाला आरपीआय संरक्षण देईल असंही आठवले यांनी जाहीर केलं आहे.