केंद्र सरकारने घाऊक व्यापाऱ्यांना 25 मेट्रिक टन तर किरकोळ व्यापाऱ्यांना २ मेट्रिक टन कांदा साठवणुकीची मर्यादा दिलेली आहे मुळात सध्या बाजार समिती म्हणते येणारा लाल कांदा याची 20 ते 25 दिवस टिकवण क्षमता असते.
कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकरी वर्ग अपरिपक्व कांदा विक्रिस आणत असल्याने त्याला वाळविणे, प्रतवारी करने,पॅकिंग करणे याला वेळ लागत असल्याने किमान तीन ते चार दिवस कांदा खळ्यावर पडत आहे त्यामुळे साठवणुकीची मर्यादा आल्याने याचा थेट परिणाम हा कांदा खरेदीवर होणार आहे.
शेतकऱ्यांना दोन पैसे भेटत आहे तर भेटून द्या गेल्या तीन चार वर्षानंतर शेतमालाला समाधानकारक भाव मिळत आहे.
निवृत्ती न्याहरकर,शेतकरी
कांद्याचे वाढलेले तर लक्षात घेता शहरी ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून शासन कांदा बाजार भाव नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. ज्यावेळी कांदा हा मातीमोल भावाने विकला जातो त्यावेळी तुटपुंजी मदत देऊन पाने पुसली जातात. त्यामुळे शासनाने खाणाऱ्या बरोबर पिकवणारा याचाही विचार केला पाहिजे.
मंगेश गवळी, ब्राह्मणगाव