कोरोना व्हायरेसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू लावण्याची घोषणा केली. यामुळे शनिवारी रात्री 12 वाजेपासून रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत रेल्वेसेवा बंद होणार आहे.
- Advertisement -
एकूण 2400 रेल्वे रद्द केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेल, एक्स्प्रेस ट्रेनसुद्धा सकाळी 4 वाजता बंद करण्यात येणार आहे.
प्रशासनाने 245 रेल्वे यापूर्वीच रद्द केल्या आहेत. दरम्यान आयआरसीटीसीने पुढील आदेशापयर्र्ंत रेल्वेतील खानपान सेवा बंद केली आहे.