Friday, April 26, 2024
Homeनाशिकपारावरच्या गप्पा : समाजाची मानसिकता बदलावी लागेल

पारावरच्या गप्पा : समाजाची मानसिकता बदलावी लागेल

(गावातली सगळी पोर गप्प बसलेली)

रंग्या : अरे तुम्हाला कळलं का? त्या हैदराबादच्या घटनेबद्दल?
दाम्या : हो, कळलं यार ..खूप संताप होतोय? अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचला पाहिजे.
तान्या : पण आपण काय करणार अशावेळी?
दाम्या : आपण ना? आपण फक्त मेणबत्या जाळायच्या ..बस्स ..दुसऱ्या दिवशी रोजच रुटीन सुरु?
हे कधी थांबायचं ?

- Advertisement -

रंग्या : अगदी खरंय आपण फक्त सोशल मीडियावर बोलतो, निषेध करतो. श्रद्धांजलीपुरता …
दाम्या : किती दिवस सोशल मीडियावरून संताप करणार, रस्ते भरून मोर्चे काढून निषेध करणार?
पाटलाच्या तुक्या : काय रे पोराओ काय झालंय? खूपच रंगात दिसताय तुम्ही ?
दाम्या : तात्या , तुम्ही कालची बातमी वाचलीच असलं. अहो किती दुर्दैवी घटना घडली त्या मुलीसोबत..

पाटलाच्या तुक्या : व्हय म्या वाचली तर .. काळजात चर्रर्र झालं र .. आपल्या समाजातही इतकी घाण मानसिकतेची लोक राहतात?
दाम्या : तात्या, माणसांत माणुसकी राहिली नाही ओ जो पर्यंत कठोर शासन होत नाही तो पर्यंत हे, असं होतं राहणार..उगाच बेटी बचाव आपण नारा देत आलोय…
रंग्या : खरं हाय, अशांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी कायदाही कठोर व्हायला हवा, यापुढे कोणताही माणूस असे कृत्य करणार नाही.

तान्या : खरंच काय त्या मुलीचा दोष होता, अशा अनेक निर्भया आज बळी पडत आहेत. पण निषेध नुसता सोशल मीडियापुता मर्यादित न राहता त्याच न्यायाच्या रूपांतर झालं पाहिजे.
भग्या : खरंय नुसत्या मेणबत्या जाळून आणि मोर्चे काढून काय होणार, लोकांना नुसतं वाईट वाटून काय होणार , यात बदल व्हायला, हवा आपण नुसते म्हणतो भारत युवकांचा देश आहे, मग नुसतं सोशल मीडियावर निषेध करण्यापुरता युवक नकोय, न्यायासाठी लढणारा युवक हवा आहे.

रंग्या : व्हय, प्रत्येक मुलगी हि आपली जबाबदारी आहे असं युवकांनी वागायला हवं..
पाटलाच्या तुक्या : तरुणांची जबाबदारी आहेच पण मुलींनीही आपल्या स्वसंरक्षणासाठी योग्य ते प्रशिक्षण घ्यायला हवे. यासाठी भाऊ, वडील, नवरा यांनी पुढाकार घेत तिला स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे.
दाम्या : अगदी खरंय, महिला शारीरिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. तसेच महत्वाचे म्हणजे समाजात सुद्धा बदल आवश्यक आहे.

पाटलाच्या तुक्या : हो समाजात बदल घडण आवश्यक आहे. कारण अत्याचार करणाऱ्यांना समाजाचा, सुरक्षा यंत्रणांचा धाक राहिला नसल्यानं अशा गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललंय.. मुली-स्त्रियांना सर्व दृष्टीने सक्षम होण्याची गरज आहे… निर्भयपणे वावरता यावं यासाठी वातावरण तयार करावं लागेल, आणि पुरुषप्रधान मानसिकता बदलावी लागेल…याकामी अर्थातच पुरुषांना पुढाकार घ्यावा लागेल…

- Advertisment -

ताज्या बातम्या