त्यानुसार सकाळपासूनच लासलगाव, विंचूर, देवळा, सटाणा, येवला, अंदरसूल, मुंगसे (मालेगाव) येथील बाजार आवाराच्या प्रवेशद्वारावर संघटनेचे पदाधिकरी उपस्थित होते. कांदा विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाची माहिती देत कांडा निर्यातबंदी हटवण्याची केवळ घोषणा करण्यात आली असुन जोपर्यत सरकार अधिसूचना काढत नाही तोपर्यंत आपले नुकसान सुरूच राहिल ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर बहुतांश शेतकऱ्यांनी आपलीय वाहने घराच्या दिशेने माघारी वळवली.