वीरगावात शेतक-यांनी ४०एकर शेतीवर शेडनेट उभारली आहे. या शेडनेटचे वादळात मोठे नुकसान झाले. वीरगाव येथील विरेंद्र थोरात आणि दिनकर थोरात यांचे पॉलिहाऊसला लाखोंचा फटका बसला. भाऊसाहेब वाकचौरे, नानासाहेब वाकचौरे,रामकिसन तोरकड,संदीप तोरकड,साहेबराव पानसरे,विश्वास भांगरे,बाळासाहेब तोरकड,विनायक शेळके आणि हिवरगाव आंबरे येथील ठका लुमा मधे,बाळासाहेब मधे,देवराम मेंगाळ यांचे शेडनेटचे वादळाने मोठे नुकसान केले.या शेतक-यांना वादळाने लाखोंचा फटका दिला.झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करावे अशी मागणी होत आहे.