पुढील पंधरा दिवस सर्व शासकिय कार्यक्रम रद्द; जिल्हाधिकारी व्दिवेदी यांची माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील पंधरा दिवस सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. नागरिकांनी देखील लग्न समारंभ, यात्रा, वाढदिवसाच्या पार्ट्या व अन्य गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच चित्रपट गृह, मॉल या ठिकाणी असणारे रिलिंग व खुर्च्या वर असणारे कोरोना इन्फेक्शन टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहे.