सिंचन प्रकल्पांची चौकशी ? फडणवीसांचे संकटमोचक ‘संकटात’

सिंचन प्रकल्पांची चौकशी ? फडणवीसांचे संकटमोचक ‘संकटात’

मुंबई – 

सत्ता जाताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाजन हे जलसंपदामंत्री असताना सरकारच्या शेवटच्या काळात जळगाव जिल्ह्यातील चार जलसिंचन प्रकल्प मंजूर झाले. हे चारही प्रकल्प आता चौकशीच्या फेर्‍यात अडकरणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील वाघूर मोठा प्रकल्प, हतनूर प्रकल्प टप्पा-1, वरणगाव-तळवेल उपसा सचिंन योजना व व शेळगाव बॅरेज या चार प्रकल्पांसाठी 5 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.

मात्र हा निर्णय घेताना नियमांचे पालन करण्यात आलेले नाही, असा आरोप होत आहे. यामुळे उद्धव ठाकरे सरकारने या प्रकल्पाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सत्तेत आल्यानंर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या प्रकल्पांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. कुठलेही प्रकल्प थांबविण्यात येणार नाहीत मात्र अनावश्यक खर्च थांबविणार असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

तर सर्व प्रकल्पांचा आढावा घेऊन अग्रक्रम ठरविण्यात येणार असल्याचेही सरकारने म्हटले आहे. या प्रकल्पांसाठी नुसताच 5 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र त्या प्रस्तावांना अर्थमंत्रालयाची परवानगीच नव्हती असेही म्हटले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com