जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार ४ जून पर्यंत या वादळाचा परिणाम व तडाखा नाशिकसह उ.महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. अतीवृष्टी, सोसाटयाचा वारा व वादळ, वीज कोसळणे या संकटाचा सामना करावा लागू शकतो.
ते लक्षात घेता नागरिकांचे स्थलांतरण, सुरक्षित निवार्याची व्यवस्था, निर्जंतुकिकरण, कोव्हीड रुग्णांचे स्थलांतरण, अौषध पुरवठा, मास्क व पीपीई किटचा साठा, आपत्ती व्यवस्थापनाची पथके व मदत कार्य याची व्यवस्था करावी असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.
याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगर पालिका व नगर पंचायत यांना पत्राद्वारे सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहे.