Friday, April 26, 2024
Homeनगरवसतिगृहातून तीन अल्पवयीन मुलांना पळविले

वसतिगृहातून तीन अल्पवयीन मुलांना पळविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील यतीमखाना अ‍ॅण्ड बोर्डींग मुलांचे वसतिगृहातून तीन अल्पवयीन मुलांना कोणीतरी फूस लावून पळवून नेण्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वसतिगृहाचे अधीक्षक गुफरान रफिक शेख (वय 34 रा. मुन्सीपल हाडको, टिव्ही सेंटर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

शहरातील जुनी महानगरपालिकेसमोर यतीमखाना अ‍ॅण्ड बोर्डींग मुलांचे वसतिगृह आहे. याठिकाणी मागील दोन वर्षापासून कामटीपुरा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील दोघे व सिध्दार्थनगर, शिरूर (ता. शिरूर, पुणे) येथील एक असे तीन अल्पवयीन मुले शिक्षणाकरिता राहत आहेत. बुधवारी सायंकाळी आरबी क्लास संपल्यानंतर वसतिगृहामध्ये जेवण होते. त्यावेळी वसतिगृहातील इतर मुले जेवण करण्यासाठी हजर होती.

मात्र तीन मुले तेथे हजर नसल्याने अधीक्षक शेख यांनी त्या मुलांचा सर्वत्र शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत. त्यानंतर अधीक्षक शेख यांनी मुलांच्या पालकांना फोन करून सदर मुलांबाबत विचारले असता त्यांनी मुल घरी आले नसल्याबाबत सांगितले. त्यानंतर अधीक्षक शेख व त्यांच्या कर्मचार्‍यांनी नगर शहरात तिन्ही मुलांचा शोध घेतला असता ते मिळून न आल्याने कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने तीन मुलांना फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद दाखल झाली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या