दिल्ली | Delhi
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२१ मध्ये मतदारांनी कुणाला कौल दिलाय, हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी ८.०० वाजल्यापासून मतमोजणीला झाली आहे.
दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला यावेळी भाजपने जोरदार लढत दिली. भाजपच्या दिग्गज नेते यावेळी ममता बॅनर्जींविरोधात मैदानात उतरले होते. राज्यात २९४ जागांसाठी २७ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले.
सत्ता स्थापनेसाठी १४८ जागांची आवश्यकता आहे. ममता बॅनर्जी हॅट्रिक करणार की भाजप सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये सर्व कल हाती आले आहेत. कलांमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्व कल हाती आले आहेत. कलांमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसत आहे. तृणमुल काँग्रेस १५३ जागांवर आघाडीवर असून भाजप ११९ तर दवे ०४ आणि इतर ०३ जागांवर आघाडीवर आहे.
परंतु नंदीग्राम मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेरीस ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपचे शुभेंदू अधिकारी आघाडीवर आहे.