जळगाव – jalgaon
वाघुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली असून धरण १०० टक्के भरले आहे. सद्यस्थितीत वाघूर धरणाचे दोन द्वारे १० से.मी.ने उघडण्यात आली आहे व त्याद्वारे ६७७ क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
- Advertisement -
नदीकाठावरील सर्व लोकांनी सावध राहावे. नदीपात्रामध्ये कोणीही प्रवेश करू नये, शेतीसाठी उपयुक्त सामान ठेवू नये किंवा गुरेढोरे सोडू नये असे आवाहन कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांचे मार्फत करण्यात आले आहे.