Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशशेतकरी आंदोलन : ‘वीर तुम बढ़े चलो...’ राहुल गांधींचा कवितेतून केंद्रावर निशाणा

शेतकरी आंदोलन : ‘वीर तुम बढ़े चलो…’ राहुल गांधींचा कवितेतून केंद्रावर निशाणा

नवी दिल्ली –

नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज एक कविता ट्विट केली आहे. त्यांनी या कवितेतून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकर्‍यांना वीराची उपमा देत राहुल यांनी वीर तुम बढे चलो शिर्षकाखाली चार ओळी लिहील्या आहेत.

शेतकरी आंदोलकांना दिल्लीच्या सीमेवर प्रशासनाकडून होणारी अडवणूक, त्यांच्यावर होणारे लाठीहल्ले, पाण्याच्या फवार्‍याचा मारा अशा सर्वांचा उल्लेख राहुल यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या जाचाला शेतकर्‍यांनी अजिबात घाबरुन जाऊ नये, तुम्ही देशाचे अन्नदाता आहात, असं म्हणत राहुल यांनी शेतकरी आंदोलकांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल यांची कविता…

वीर तुम बढ़े चलो

धीर तुम बढ़े चलो

वॉटर गन की बौछार हो

या गीदड़ भभकी हज़ार हो

तुम निडर डरो नहीं

तुम निडर डटो वहीं

वीर तुम बढ़े चलो

अन्नदाता तुम बढ़े चलो!

राहुल यांनी या कवितेसोबत शेतकरी आंदोलनाचे काही फोटो देखील ट्विट केले आहेत. या फोटोंमधून शेतकरी आंदोलकांसमोर आव्हानं दाखविण्याचा राहुल यांनी प्रयत्न केला आहे. शेतकरी आंदोलकांवर होणारे पाण्याच्या फवार्‍याचे मारे, शेतकर्‍यांना झालेल्या जखमा, वृद्ध महिला शेतकर्‍यांचा बोचर्‍या थंडीत ठिय्या आणि आंदोलनासाठी झालेली गर्दी असे काही फोटो राहुल गांधी यांनी कवितेसोबत ट्विट केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या