Sunday, April 28, 2024
Homeनगरवटपौर्णिमेपासून जिल्ह्यात ‘एक व्यक्ती एक झाड’ अभियान

वटपौर्णिमेपासून जिल्ह्यात ‘एक व्यक्ती एक झाड’ अभियान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संकटात प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची आवश्यकता व मोल अधोरेखीत झाले. ऑक्सिजन पुरवठ्याअभावी अनेक रूग्णांचा दुर्देवाने मृत्यू झाला. हवेतील प्राणवायूची पर्याप्त मात्रेत वृद्धी व संतुलन राखणे कामी वृक्षसंवर्धन महत्त्वाचेच आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनासाठी आता जिल्हा प्रशासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले असून येत्या वटपौर्णिमेपासून (दि. 24) जिल्ह्यात ‘एक व्यक्ती-एक झाड’ अभियान राबविले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली.

ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रीय सहभागाबरोबरच स्वयंसेवी संस्था, विविध पदाधिकारी यांच्यासह लोकसहभाग यामध्ये घेतला जाणार आहे. नगर परिषद, नगरपंचायत हद्दीत लोकसहभागातून वटपौर्णिमेपासून जिल्ह्यात ‘एक व्यक्ती एक झाड’ अभियान

सहा लाख 70 हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. येत्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे रोपटे लावून या अभियानाची सुरुवात होईल. डॉ. भोसले यांनी यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, पंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत. शहरी भागात वाढते वायू प्रदूषण लक्षात घेत जून ते सप्टेंबर या कालावधीत नगर परिषद, पंचायत क्षेत्रात प्रशासकिय यंत्रणा व लोकसहभागातून ‘एक व्यक्ती-एक झाड’ अभियान राबविण्यात येणार आहे.

अशी होणार वृक्ष लागवड

नगर परिषद, नगरपंचायतीनिहाय वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देखील निश्चीत केले आहे. श्रीरामपूर नगर परिषद 90 हजार, संगमनेर 90 हजार, कोपरगांव 90 हजार, राहुरी 50 हजार, देवळाली प्रवरा 40 हजार, राहाता 30 हजार, पाथर्डी 30 हजार, श्रीगोंदा 35 हजार, शेवगाव 40 हजार, जामखेड 40 हजार, शिर्डी नगरपंचायत 40 हजार, अकोले 20 हजार, कर्जत 30 हजार, पारनेर 20 हजार आणि नेवासा 25 हजार असे एकूण 6 लाख 70 हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचे उद्दीष्ट निर्धारीत करण्यात आले आहे. सर्वांनी हे अभियान यशस्वी करुन पर्यावरण संवर्धनासाठी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या