चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
चाळीसगाव नगरपलिकेत सत्तांतर होऊन भाजपाने आतापर्यंत शहर विकासासाठी सर्वाधिक निधी आनला आहे. शहरवासियांसाठी अत्यंत महत्वाची १४७ कोटी रुपयांची भुयारी गटार योजनेस भाजपाच्या काळात मजुरी मिळाली आहे. परंतू ही योजना…
पूर्ण न होऊ नये म्हणून उपनगराध्यक्षा आशाताई रमेश चव्हाण व अपक्ष नगरसेविका सायली रोशन जाधव यांच्यासह शहवि आघाडीचे नगरसेवक कागदोपत्री खोळंबा घालत असल्याची आरोप पत्रपरिषदेत भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी केला.
आज दुपारी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत त्यांच्या सोबत नगरसेवक नितीन पाटील, आनंद खरात, बापू आहिरे, चंद्रकांत तायडे, नगरसेविका विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार, माजी नगरसेवक सोमसिंग राजपूत आदि उपस्थित होत. घृष्णेश्वर पाटील यांनी पुढे माहिती देतांना सांगीतले की, उद्या जिल्हाधिकार्यांपुढे या प्रकरणाची सुनावणी आहे, यावर योग्य निर्णय न झाल्यास भाजपाचे सर्व नगरसेवक उपोषणास बसणार आहे.