चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
तालुक्यातील बहाळ येथे गेल्या दोन वर्षांपासून गावाला पाणी पुरवठा करणार्या मुख्य जलवहिनीचा व्हॉल हा गटारीच्या पाण्यात गेल्या आहे.
तरी देखील ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केले जात असून गटारीत बुढालेल्या व्हॉलमधून संपूर्ण गावाला पाणी पुरवाठ केली जात असल्याचे समोर आले आहे. यासंबंधी संबंधीत ग्रामविकास आधिकारी व ग्रा.पं.सदस्यांना वारंवार तक्रारी करुन देखील काही एक उपयोग होत, नसल्याने आज थेट सोशलमीडियावर पाणी सोडण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून संबंधीतावर कारवाईची मागणी होत आहे.