सिन्नर । वार्ताहर Sinnar
तालुक्यातील कोनांबे ( Konambe ) येथील श्री साई नारायण गुरुकुलमधील (Sri Sai Narayan Gurukul) विद्यार्थ्यांनी समृध्दी महामार्गावर तिरंगा रॅलीचे ( Tiranga Rally )आयोजन केले. यात 100 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
‘भारत माता की जय, भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो, जय जवान-जय किसान, जो हमसे टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा’ अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक शरद रत्नाकर यांनी समृध्दी महार्गाविषयी माहिती दिली.
यावेळी गोवर्धन पतसंस्थेचे चेअरमन रामनाथ डावरे, सोसायटीचे चेअरमन तानाजी पवार, संचालक सुरेश पवार, प्रवीण पवार, जाकीर पठाण, राहुल जगताप, बाजीराव पवार उपस्थित होते.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. प्राचार्या नीता माळोदे, पर्यवेक्षक प्रीती बैरागी, वैशाली पवार, छाया वारुंंगसे, सरिता शिंदे, स्वाती मनोहर, योगेश काळे, अवधूत कोटकर ंयांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.