Friday, April 26, 2024
Homeनगरशेती महामंडळाचा मिळाला ताबा; वारसाच्या डोळ्यात आनंदाश्रू

शेती महामंडळाचा मिळाला ताबा; वारसाच्या डोळ्यात आनंदाश्रू

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

गेल्या सहा वर्षापासून प्रलंबित असलेला बेलापूर येथील खंडकरी शेतकर्‍यांचा अतिक्रमीत जमीन वाटपाचा प्रश्‍न सोडविण्यात आला

- Advertisement -

असून या दोन्ही शेतकर्‍यांना प्रांताधिकारी यांच्या हस्ते जमिनीचा ताबा देण्यात आला. जमिनीचा ताबा मिळताच या शेतकर्‍यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले.

या दोन खंडकरी शेतकर्‍यांना जमीनीचे वाटप करण्यात आले होते मात्र त्यावर अतिक्रमण असल्याने ताबा देण्यात आला नव्हता. या मिळकती मध्ये असलेले रहिवासी अतिक्रमण मुक्त करण्यात आले. गेल्या सहा वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

काल सकाळी बेलापूर येथील विठ्ठल दुधाळ व रामदास दुधाळ या दोन खंडकरी शेतकरी वारसांना प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या उपस्थितीत बाधा रहीत ताबा देण्यात आला. या प्रसंगी मंडलाधिकार बाबासाहेब गोसावी, मंडलाधिकारी अशोकराव बनकर, कामगार तलाठी कैलास खाडे, तहसीलचे मुकुंद म्हस्के, शेती महामंडळाचे अशोक कोल्हे तसेच मिलींद दुधाळृ हर्षद दुधाळ, दिलीप दुधाळ, अन्य कामगार तलाठी व खंडकरी वारस उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या