Saturday, May 11, 2024
Homeदेश विदेशAir India टाटा समूहाकडे गेल्याच्या वृत्तावर सरकारचे स्पष्टीकरण, म्हणाले...

Air India टाटा समूहाकडे गेल्याच्या वृत्तावर सरकारचे स्पष्टीकरण, म्हणाले…

दिल्ली | Delhi

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या एअर इंडियाच्या (Air India) खासगीकरणावर (Air India privatization) अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. एअर इंडिया आता पुन्हा एकदा टाटा समूहाच्या (Tata Group) ताब्यात जाणार आहे. (Tata Sons wins bid for Air India), असे वृत्त सर्वच माध्यमांमध्ये आले. त्यानंतर सरकारने त्यासंदर्भात खुलासा केला.

- Advertisement -

निर्गुंतवणूक विभागाकडून यासंदर्भात टि्वट करत स्पष्टीकरण करण्यात आले. त्यात म्हटले की, अजून एअर इंडियासंदर्भात काहीच निर्णय झालेला नाही. यासंदर्भात आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत. यासंदर्भात निर्णय होताच त्याची माहिती दिली जाईल.

केंद्र सरकारने (Modi Govt) निर्गुंतवणूक धोरणातंर्गत एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी (Privatization of Air India) लिलाव प्रक्रिया (Auction process) सुरू केली होती. यात अखेर टाटा सन्सने (Tata Sons) बाजी मारली आहे. केंद्राने एअर इंडियासाठीचा लिलाव टाटा सन्सने जिंकल्याचं घोषित केलं असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

सर्वात लांबलेला मान्सून संपला, आता परतीचा प्रवास

जेआरडी टाटा (JRD Tata) यांनी १९३२ साली टाटा एअरलाईन्स (Tata Airlines) कंपनी स्थानप केली होती. मात्र, काँग्रेस सरकारच्या (congress Govt) काळात या कंपनीचे सार्वजनिकीकरण झाले होते. त्यामुळे कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया (Air India News) असे करण्यात आले होते. मात्र, आज ६८ वर्षांनंतर ही कंपनी पुन्हा एकदा टाटा समूहाच्या (Tata Grop) ताब्यात आली आहे.

दरम्यान कर्जाच्या बोज्याखाली अडकलेल्या एअर इंडियाला (Air India Latest News) विक्रीसाठी सुरू करण्यात आलेली बोली प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. तसंच यावेळी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Aviation Minister Jyotiraditya Scindia) यांनी यापूर्वी तारीख बदलली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. सरकारनं यापूर्वी २०१८ मध्ये एअर इंडियातील (Air India) ७६ टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली होती. परंतु त्यावेळी सरकारला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर सरकारनं कंपनीच्या पूर्णपणे विक्रीचा निर्णय घेतला.

अंतिम तारखेपर्यंत म्हणजेच १५ सप्टेंबरपर्यंत दोन संभाव्य खरेदीदारांनी आपल्या निविदा (financial bids) दाखल केल्या होत्या. टाटा समुहाद्वारे (TATA Group) आपली होल्डिंग कंपनी आणि स्पाईसजेटचे चेअरमन अजय सिंह आणि अन्य काही जणांनी आपली बोली सादर केली होती.

सरकारनं एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केली होती. परंतु करोना (COVID19) महासाथीमुळे यामध्ये विलंब होत गेला. एप्रिल २०२१ मध्ये सरकारनं पुन्हा एकदा बोली प्रक्रिया सुरू केली. तसंच १५ सप्टेंबर ही यासाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. २०२० मध्ये टाटा समुहानंदेखील एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी उत्सुक असल्याचं पत्र दिलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या