तापी योजनेला ‘पुन्हा’ गळती

jalgaon-digital
2 Min Read

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य स्त्रोत असलेल्या तापी योजनेला जामफळ तलावानजीक गळती लागली असून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

महापालिका प्रशासनाने गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले असून यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या आठवड्यात दोन वेळा तापी योजनेची जलवाहिनी फुटली. ही जलवाहिनी प्रशासनालाही डोकेदुखी ठरत आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नकाणे तलाव, डेडरगाव तलाव आणि तापी योजना हे तीन स्त्रोत आहेत. परंतु निम्मे शहराला तापी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो.

त्यामुळे या योजनेवर पाणीपुरवठ्याची भिस्त आहे. परंतू तापी योजना ही गेल्या 20 ते 25 वर्षापुर्वी अंमलात आल्यामुळे ही योजना जिर्ण झाली आहे.

ठिकठिकाणी या योजनेला गळती लागते. त्यामुळे नेहमी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. यामुळे पाणीपुरवठा नियोजनासाठी महापालिका प्रशासनाला प्रयत्न करावे लागतात.

तापी योजनेला जुना आग्रारोडवरील जामफळ तलावानजीक मोठी गळती लागली असून या गळतीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने गळतीची दखल घेतली असून गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

तापी योजनेला पुन्हा-पुन्हा लागत असल्यामुळे प्रशासनालाही डोकेदुखी ठरत आहे. तर पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे नागरिकांनाही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. त्यामुळे प्रशासनाने गळतीवर ठोस उपाययोजना करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

जलवाहिनीही फोडली जाते

धुळ्याला पाणीपुरवठा करण्यासाठी तापी योजनेची निर्मिती करण्यात आली. या योजनेची जलवाहिनी शेताजवळून टाकण्यात आली आहे.

त्यामुळे काही शेतकरी जलवाहिनी फोडून सर्रास पिकांसाठी पाणी वापरतात. याबाबत पोलिस दप्तरीही नोंद आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने भरारी पथकांची नियुक्ती करावी.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *