Friday, April 26, 2024
Homeनगरतांदुळवाडीच्या शेतकर्‍यांचा ऊस जळाला टाकळीमियाच्या दोघांवर गुन्हा

तांदुळवाडीच्या शेतकर्‍यांचा ऊस जळाला टाकळीमियाच्या दोघांवर गुन्हा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे उसाचे पाचरट पेटवित असताना त्याकडे लक्ष दिले नाही. निष्काळजीपणा केल्याने शेजारील अमोल चव्हाण यांचा पाच एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. ही घटना दि. 12 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.

- Advertisement -

याप्रकरणी अमोल प्रभाकर चव्हाण (रा. तांदुळवाडी) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि.12 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान आरोपी हे राहुरी तालुक्यातील आरडगांव शिवारात असलेल्या त्यांच्या शेतातील उसाचे पाचरट पेटवित होते. त्यावेळी त्यांनी लक्ष दिले नाही, निष्काळजीपणा केला. त्यामुळे त्यांच्या शेतातील आग अमोल चव्हाण यांच्या शेतातील उसाला लागली. या आगीत चव्हाण यांचा पाच एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच शेजारी असलेल्या आणखी एका शेतकर्‍याच्या उसाला आग लागून त्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

चव्हाण यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी सुरेश नागनाथ सगळगिळे व बाळासाहेब नागनाथ सगळगिळे दोघे रा. टाकळीमिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार पोपट कटारे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या