मुंबई (प्रतिनिधी)-
अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागातील आगीच्या घटनेस जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या घटनेबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
- Advertisement -
अहमदनगर जिल्हा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला असून 7 गंभीर आहेत. या घटनेमुळे नगर जिल्हा हादरला आहे.
या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ व राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले.