सोशल नेटवर्कींग फोरमचा सामाजिक उपक्रम

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

करोना संकटामुळे सर्वत्र शाळा बंद आहेत.

अशातच शहरातील सोशल नेटवर्किंग फोरमने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पेठ तालुक्यातील वाडी वस्तीवर असलेल्या शाळेतील तब्बल तीन हजार मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

या मुलांना मोबाईल आणि नेटवर्क अभावी ऑनलाईन शिक्षणही मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत घराघरात अभ्यास करणार्‍या मुलांसाठी सोशल नेटवर्किंग फोरमने 30 गावातील मुलांना शैक्षणिक साहित्य ऊपलब्ध करून दिले.

हे साहित्य एसएनएफच्या ग्रामसमन्वयाकानी संकट काळात सामाजिक जबाबदारी निभावून बालकांच्या घरापर्यंत पोहच केले आहे. त्यामुळे ते खर्‍या अर्थाने करोना योद्धा झाले आहेत. सोशल नेटवर्कींग फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या संकल्पनेतून व पेठ तालुका समन्वयक रामदास शिंदे यांच्या पुढाकाराने गाव तेथे एसएनएफ या अभियानात गावा गावात सामाजिक कार्याची उर्मी असलेल्या युवकांना एकत्र करून भक्कम टीम तयार करण्यात आली.

याच ग्राम समन्वयकांच्या आयोजन, नियोजन व संयोजनातून शैक्षणिक साहित्य वाटपाची मोहीम यशस्वी करण्यात आली आहे. सोशल नेटवर्कींग फोरमच्या व्यासपिठावरुन या तरुण ग्राम समन्वयकांनी आपली जबाबदारी ओळखून आपल्या चिमुकल्या बंधू- भगिनींना ज्ञानार्जनासाठी साहित्य पोहचवले.

आदिवासी भागात आरोग्य, शिक्षण आणि पाण्याच्या अनेक समस्या असतात. या समस्या वेळेवर फोरमपर्यंत पोहोचल्या तर त्या सोडवण्यास प्रयत्न केले जातात. यासाठी गाव तिथे ग्रामसमन्वयक ही संकल्पना राबवली आहे. गावकर्त्यांच्या माध्यमातून अनेक समस्या एसएनएफ पोहोचू लागल्या आहेत आणि त्यापैकी काही सोडवण्यातही ते ठरले आहेत. विशेष ऊल्लेखनीय बाब म्हणजे पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा तालुक्यातील अनेक तरूणांनी या सामाजिक कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *