श्रीरामपूर (प्रतिनिधी) –
राहुरी तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी वांजुळपोईच्या ग्रामपंचायत निवडणूकमध्ये मंत्री प्राजक्ता तनपुरे व आ लहू कानडे यांच्या
- Advertisement -
मार्गदर्शनाखाली गावात जनसेवा मंडळ यांच्या हातात गावाचा कारभार आला असून गावातील सौ. सविता बाळासाहेब कोळपे यांची सरपंचपदी वर्णी लागली तर उपसरपंचपदी सौ. वैशाली अंबादास जाधव यांची वर्णी लागली.
निवडीचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी जनसेवा मंडळ अध्यक्ष कचरू तागड, विष्णुपंत ठोसर, धोंडिभाऊ रासकर, रावसाहेब जाधव, शिवाजी पवार, भाऊराव कदम, अण्णासाहेब कायगुडे, रमेश जाधव, भाऊसाहेब पावर, भिवाजी बाचकर, बापू दातीर, सिद्धार्थ कांगणे, दामू बाचकर यासह गावातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.