Wednesday, April 24, 2024
Homeनगरकोणी कोणत्याही गटात गेला तरी काही फरक पडत नाही - सत्यजित कदम

कोणी कोणत्याही गटात गेला तरी काही फरक पडत नाही – सत्यजित कदम

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Devalali Pravara

कोणी, कोणत्याही पक्षात गेला किंवा इतर कुठे गेला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. शेवटी भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष असल्याने पक्ष संघटन मजबूत आहे. या जोरावर आम्ही नगरपरिषदेच्या निवडणुकीत बहुमताने येणार असल्याची प्रतिक्रिया भाजयुमो दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड हे शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होत आहे. भांड हे जर शिंदेसेनेत गेले तर त्याचा नगरपरिषद निवडणुकीवर काही परिणाम होऊ शकतो का? किंवा भाजपावर काही परिणाम होऊ शकतो का? याबाबत सत्यजित कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भांड यांचे नाव न घेता दै. सार्वमतशी बोलताना वरीलप्रमाणे प्रतिक्रीया व्यक्त केली.

कदम म्हणाले, आमचा किल्ला अभेद्य आहे. त्याला कोणीही छेद देऊ शकत नाही. अशी मजबूत तटबंदी आम्ही केलेली आहे. त्यामुळे कोण, कोणाच्या पक्षात गेला? शिंदे गटात गेला? की आणखी कुठे गेला? याचा भाजपावर कोणताही परिणाम होऊ शकत नसल्याची प्रतिक्रिया कदम यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या