Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedसानिया मिर्झा सोशल मीडियापासून लांब राहणार, कारण...

सानिया मिर्झा सोशल मीडियापासून लांब राहणार, कारण…

आजपासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. त्यातच टीम इंडियाचा पहिला सामना 24 ऑक्टोंबरला पाकिस्तान सोबत होणार आहे.

सानियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात म्हटले की, भारत-पाक सामन्याच्या दिवशी सोशल मीडियावर विविध प्रकारची चुकीची माहिती व अफवा पसरवली जाईल. सोशल मीडियावर व टॉक्सिसिटी (Toxicity) वातावरणापासून आपण लांब राहणार आहोत.

- Advertisement -

सानिया ही भारतासाठी टेनिस खेळते तर तिचा नवरा शोएब हा पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळतो. तो टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाचा सदस्य आहे. त्यामुळे नेटकरी सानियाला जास्तच ट्रोल करतात.

सोशल मीडियापासून सानिया दूर जाणार नाही. फक्त भारत-पाकिस्तान सामन्यापुरती ती सोशल मीडियावर नसेल.

भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यानचे वातावरण आतापासून तापायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यानं कर्णधार बाबर आझम याच्या ट्विटर हँडलवर धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात विजय प्राप्त केला नाही, तर तुला घरी येऊ देणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या