श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी आर्वी व अजनुज येथे सुरू असलेल्या विनापरवाना वाळू उपसा करत असलेल्या बोटी रंगेहाथ पकडून 20 लाख रुपयांच्या बोटी उद्ध्वस्त केल्या.
श्रीगोंदा तालुक्यातील भिमा नदीच्या पात्रात रात्रंदिवस राजरोसपणे अनेक दिवसांपासून वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार मिलिंद कुलथे यांना समजली. त्यानुसार आज (दि.6) त्यांच्या पथकाने आर्वी व अजनुज या ठिकाणी भीमा नदी पत्रात वाळू उपसा करत असणार्या बोटी दिसून आल्या. तहसीलदार यांच्या पथकाला पाहताच बोटी वरील चालक व इतर कर्मचारी पळून गेले. मात्र तहसीलदार यांनी 20 लाख रुपये किमतीच्या दोन्ही बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या.
वाळू तस्करी करण्यासाठी तहसीलदार व पोलीस अधिकारी यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वाळू माफियांचे पंटर चौकाचौकांत बसून एकमेकांना खबर देतात. यामुळे अवैध वाळूची वाहतूक शहरातून सुरळीतपणे तालुक्यात होत असते. अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राधाकृष्ण विखे पाटील व पोलीस अधीक्षक राकेश ओला हजर झाल्यापासून वाळूतस्करीला आळा बसला आहे.