संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
सकल हिंदू समजाचा मोर्चा संपन्न झाल्यानंतर समनापूर येथे घडलेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तालुक्यातील श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की,सकल हिंदू समाजाचा मोर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात निघणे म्हणजे समाजाच्या भावना किती तीव्र आहेत हे लक्षात येते.मात्र शांततापूर्ण मार्गाने हा मोर्चा संपन्न झाल्यानंतर समनापूर येथे घडलेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश आपण दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर आणि संगमनेर येथील घटनेवर शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करून मंत्री विखे पाटील म्हणाले की राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मातरांच्या मोठ्या घटना घडत असताना त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे, राज्यात तुमची सता असताना सर्जील उस्मानीने हिंदू धर्माच्या विरोधात केलेले वक्तव्य असेल किंवा राज्यात देवभक्ती आणि देशभक्ती दाखववणार्या नागरिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची तुमची भूमिका सर्वानी पाहीली.
राज्यात घडणार्या या घटनाबाबत कधी तरी तुमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करा असे थेट आव्हान मंत्री विखे पाटील यांनी दिले.