Thursday, April 25, 2024
Homeनगरलाळ खुरकूत आजाराने 30 गायींचा मृत्यू

लाळ खुरकूत आजाराने 30 गायींचा मृत्यू

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

लाळ खुरकूत व घटसर्प अशा प्रकारच्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन सुमारे 25 ते 30 गायींचा मृत्यू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पशुवैद्यकीय विभागाने तातडीने लक्ष घालून संसर्गजन्य रोगाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे दुग्ध व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांच्या दिवाळी सणाच्या तोंडावर अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होऊन लाळ खुरकूत व घटसर्प अशा प्रकारच्या संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव होऊन सुमारे 25 ते 30 गायी मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामध्ये संदीप काकड यांच्या 7 गायी, जनार्धन काकड 4 व बाबासाहेब काकड यांच्या 4 गायी, विलास गीते यांच्या 3 गायी, तात्या तमनर 3 व 2 आजारी या ताप व जिभेवर काटे येणे आजारात जनावरे दगावल्याने दिवाळीच्या सणासुदीच्या काळात कुटुंंबावर मोठे संकट ओढवले आहे.

पशुवैद्यकीय विभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी अजित पवार, एकनाथ पवार, विलास गिते, दादाहरी रोठे, किशोर रोठे शंकर काकड, सचिन आघाव, किशोर रोठे, तात्या तमनर आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या