Wednesday, April 24, 2024
Homeनगरइंधन म्हणून इथेनॉलच्या 100 टक्के विक्रीस परवानगी

इंधन म्हणून इथेनॉलच्या 100 टक्के विक्रीस परवानगी

नगर जिल्ह्याला होऊ शकतो अधिक फायदा

भंडारदरा, मुळा, निळवंडे ही धरणं नगर जिल्ह्याची जीवनदायिनी. तसेच नाशिकमधील दारणा, गंगापूर आणि पुणे जिल्ह्यातील कुकडी, घोड धरणांचे पाणी नगर जिल्ह्याला मिळते.

- Advertisement -

प्रवरा, मुळा, भीमा, कुकडी, सीना, म्हाळुंगी यासह अनेक नद्यांमुळे गावागावांत धरणांतील पाण्याचा स्पर्श झाला. पुढे येथील ऊस शेती बहरली. साखर कारखान्यांना बरकत आली. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था धावू लागली. पण पुढे या उद्योगाला घरघर लागली. यातून हा उद्योग बंद पडतो की काय असे वाटत असतानाच, आता पेट्रोल-डिझेलप्रमाणे 100 टक्के इंधन म्हणून इथेनॉल वापरण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने या नगर जिल्ह्यातील साखर कारखाने आणि लाखो शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

नगर जिल्ह्यात सर्वाधिक 23 साखर कारखाने आहेत. यापैकी 9 साखर कारखान्यांकडे इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प आहेत. यात नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर (लोकनेते मारूतराव घुले पाटील), प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील, शेवगावमधील गंगामाई, श्रीरामपुरातील अशोक, कर्जतमधील अंबालिका, श्रीगोंद्यातील साईकृपा, कोपरगावातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (संजीवनी) आणि कर्मवीर स्वर्गीय शंकरराव काळे या साखर कारखान्यांचा समावेश आहे.

या कारखान्यांतून दररोज 4 लाख 15 हजार लिटर इथेनॉल निर्मिती होते. तसेच मुळा, संगमनेर(सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात आणि वृध्देश्वर या कारखान्यांचे प्रकल्प प्रस्तावित आहे. इथेनॉलचा वाढता वापर होणार असल्याने शेतकर्‍यांचे उत्पन्नही वाढेल. कारण इथेनॉल ऊस, मका आणि इतर अनेक पिकांपासून बनविले जाते. साखर कारखानदारांना मिळकत करण्याचा एक नवीन मार्ग मिळेल, जेणेकरून त्यांच्या शेतीतील थकबाकी परतफेड करू शकतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या