Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधहृदय रेषेमुळे रणबीर प्रेमात असफल

हृदय रेषेमुळे रणबीर प्रेमात असफल

प्रफुुुल्ल कुलकर्णी – ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड,8888747274

रणबीर कपूरचा जन्मदिन 28 सप्टेंबर 1982. चित्रपटसृष्टी गाजविणारे ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा पुत्र. आज रणबीर हिंदी चित्रपटसृष्टीत आघाडीचा अभिनेता व सर्वाधिक मानधन घेणार्‍या कलाकारांपैकी एक आहे. 2012 मध्ये फोर्ब्स इंडियाने 100 प्रभावी सेलिब्रिटींच्या यादीत त्याचा समावेश केला होता. रणबीरने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक फिल्मफेअर पुरस्कारांसह प्रेक्षकांची मनेही जिंकली आहेत.

- Advertisement -

भारतीय चित्रपटसृष्टीचे शोमन म्हणून ज्यांचा गौरव होता, त्या ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांचा रणबीर नातू. त्याने संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामाचा अनुभव घेतला आणि भंसाली यांच्याच ‘सांवरीया’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

’सावरीया’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. मात्र रणबीर प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. ’रॉकस्टार’ आणि ‘बर्फी’ हे चित्रपट रणबीरसाठी माइलस्टोन ठरले. रॉकस्टारने त्याला खर्‍या अर्थाने स्टार बनविले.

तर बर्फिने तो ताकदीचा अभिनेता आहे, यावर शिक्कामोर्तब केले. ‘ये जवानी है दिवानी’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दीपिका पादुकोणसोबतची त्याची केमेस्ट्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सुपरस्टार अभिनेत्री एश्वर्या रायसोबतचा ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाची चर्चा खूप झाली, मात्र व्यावसायिक कामगिरी सुमार ठरली.

त्याच्यासाठी 2018 हे वर्ष विशेष ठरले. राजकुमार हिरानीच्या ‘संजू’ या चित्रपटात त्याने संजय दत्तची भूमिका साकारली होती. आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांपैकी हा एक होता. या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा दुसरा फिल्मफेअर पुरस्कार त्याने पटकावला. इंडियन सुपर लीग फुटबॉल संघ मुंबई शहर एफसीचा तो सह-मालक आहेत.

‘बचना ए हसीनो’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना रणबीर कपूरने आपली सह-अभिनेत्री दीपिका पादुकोणला डेट करण्यास सुरवात केली. पण एक वर्षानंतर या जोडप्याचे ब्रेकअप झाले. रणबीरने हे ब्रेकअप मैत्रीपूर्ण आहे, असे म्हटले होते. मा मात्र नंतर अपरिपक्वपणामुळे दीपिकापासून दूर झाल्याचे त्याचे कबुल केले. ‘अजब प्रेम की गजब कहानी’च्या निर्मितीदरम्यान कतरिना कैफसोबत अफेअरच्या अफवा पहिल्यांदा समोर आल्या.

रणबीर कपूरने सुरुवातीला या नात्याबद्दल बोलण्यास नकार दिला. 2015 मध्ये हे संबंध कबुल केले. ‘आमच्या दोघांनाही आमच्या नात्याबद्दल खात्री झाली आहे आणि हे संबंध उघड करण्यास मला बिलकुल संकोच होत नाही.’ असे तो म्हणाला होता. नंतर मीडियातच कतरीनासोबतही ब्रेकअप झाल्याचे समोर आले.

2018 मध्ये आलिया भट्टसोबत डेट करत असल्याचे समोर आले. आलिया त्याची ‘ब्रम्हांड’ चित्रपटातील सहकलाकारही आहे. रणबीर आज 39 वर्षाचा आहे. अनेक प्रेम प्रकरणे झाली, त्यांची उघड चर्चा झाली पण कुठलेच प्रेमसंबंध सफल झाले नाहीत. असे का झाले, याचे उत्तर रणबीरच्या हृदयरेषेवर आढळते.

मानवी शरीरावर विनाकारण कुठलीही गोष्ट नाही. प्रत्येकाचे कार्य आहे काम आहे. प्रत्येकाच्या हातावरील रेषा निरुपयोगी व व्यर्थ नव्हे. त्या रेषा काही विशिष्ट उद्देशासाठी हातावर तयार झालेल्या असतात. व्यक्तीचा आयुष्याच्या नकाशा हातावर उमटलेला असतो. हातावरील रेषा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील बारीकसारीक घटना व तपशील दाखवतात. चांगले आणि वाईट कार्य दाखवतात. हातावरील काही रेषा उमटतात, क्षीण होतात किंवा नाहीशा होतात. त्या वेळेस त्या व्यक्तीच्या विविध भावना दाखवतात.

हस्तसामुद्रिक हात व हातावरील रेषा यांचे हस्तसामुद्रिक अभ्यासक तज्ञ आहे. हातावरील रेषा कोणत्या उद्देशाने आहेत. त्यांचे कार्य काय आहे? प्रत्येक व्यक्ती त्यांचे जीवन कसे व्यतीत करेल, हे शोधण्याचा व पाहण्याचा एकमेव नैसर्गिक मार्ग हस्तसामुद्रिक आहे. ब्रह्मनिर्मीत रवी हात व हातावरील रेषा रुपी नकाशा हस्तसामुद्रिक अभ्यासकाला त्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी एक नैसर्गिक साधन आहे. लक्षणांचा अभ्यास गांभीर्याने केल्यानंतर अशा अनेक गोष्टी सांगता येतात. किंवा त्या जाणून घेता येतात. व्यक्तीच्या बौद्धिक व मानसिक वर्तनातील बदल, आरोग्य प्रकृती मनातील बदल, आयुष्यातील घटनेचा तपशील थोडक्यात भूत आणि भविष्य काळातील घटनांचे अचूक चित्रण या हातावरील रेषा करतात.

आपल्या आंतरिक मनातील जाणिवांना मर्यादा नसतात काय घडले आहे आणि काय घडू शकते, याचा अंदाज हस्तसामुद्रिक अभ्यासकाला येतो. भविष्यात काय घडणार आहे हे पाहू शकतात. व्यक्तीचे कर्म, भाग्य व मन हे हातावरच्या रेषा बनवतात, नियंत्रित करतात आणि त्यामध्ये बदल घडवून आणतात. म्हणूनच हातावरील रेषा भूत वर्तमान व भविष्य काळाचा ठसा आपल्या हातावर उमटवितात. हातावरील रेषा मन व भाग्याची प्रतिनिधित्व करतात.

रणबीरचे प्रेम हृदय रेषेमुळे प्रेम झाले नाही. रेषा प्रेम भावना, वात्सल्य व स्वार्थ दाखविते. करंगळीपासून पहिल्या बोटापर्यंत आडवी रेषा गोलाकार गेलेली अखंड उत्तम समजली जाते. हातावरील कुठलीही रेषा अपूर्ण असेल, तिच्यात बदल झालेले असतील तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात व स्वभावात सुध्दा बदल होतात. रणबीरच्या दोन्ही हातावरील हृदय रेषा नियमाप्रमाणे नाही. गोलाकार नाहीत, हातावर सरळ गेलेल्या व तुटल्या आहेत. डाव्या हातावर हृदय रेषेचे दोन तुकडे आहेत. दोन तुकड्यामध्ये काळा डाग आहे. तळ हातावर तीळ, डाग धब्बा असेल तर ते अशुभ समजले जाते.

दोनही हातावरील हृदय रेषा अपुर्‍या व सरळ रेषेत आहेत. त्या मुळे यांच्यात प्रेम भावना स्वार्थी असतात. एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम व खूप राग धरतात. अश्या सरळ व तुटक, मस्तक रेषेला खेटून असलेल्या हृदय रेषेच्या व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागतात. दुसर्‍याच्या भावनांची कदर करीत नाहीत. रणबीर कपूर यांचे प्रेम सफल झाले नाही त्याला कारण त्यांची बिघडलेली हृदय रेषा अशुभ आहे. या रेषेमुळे कुठल्याही व्यक्तीवर कायम स्वरूपी विश्वास टाकू शकत नाही. शंखेखोर व स्वार्थी वृत्ती असते. बेगडी प्रेम असते. व्यक्तीतील स्वारस्य संपले कि हे तिच्यापासून दूर जातात.

- Advertisment -

ताज्या बातम्या