Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधविभीषण चांगले की वाईट ?

विभीषण चांगले की वाईट ?

भावांमध्ये अंतर : रामायणात एकीकडे राम होते तर दुसरीकडे रावण. जिथे प्रभू श्रीरामाला त्यांचे भाऊ देव मानत असे तर दुसरी कडे रावणाचे भाऊ त्याला गुन्हेगार, गर्विष्ठ आणि अहंकारी मानत असे. हेच अंतर असे दोघांमध्ये. रावणाच्या सख्या भावांनी कुंभकर्ण आणि विभीषणाने रावणाला समजावले की जे आपण करीत आहात ते चुकीचे आहे. रावणाच्या सावत्र भावांमध्ये एक कुबेर होता ज्यांचापासून रावणाने लंका हिसकावून घेतली. खरं, दूषण आणि अहिरावणाने रावणची मदत केली होती. तसेच रावणाला तिच्या सख्या बहिणीच्या व्यतिरिक्त त्याचा सावत्र बहीण कुंभिनीनेसुद्धा मदत केली होती. रावणाचे आपल्या भावांशी संबंध शक्ती आणि सत्तेच्या बळावर होतं. तर रामाचे आपल्या भावांशी संबंध प्रेम आणि त्यागाच्या बळावर होय.

रावणाला समजावले : रावणाने जेव्हा सीताचे हरण केले, तेव्हा विभीषणाने परस्त्रीला हरण करून आणणे पाप असल्याचे सांगितले, आणि सीतेला परत रामाकडे पाठवून देण्याचा सल्लाही दिला. विभीषण रावणाला धर्म संगत शिक्षण देत होता. पण रावण त्याला काही जुमानतच नसे. विभीषणाचे रावणाला समजवले की हे कार्य काय धर्माविरुद्ध आहे. रावणाला त्याची बायको मंदोदरी, त्याचे आजोबा, माल्यवान आणि रावणाचे सासरे मयासुर पण तेच समजावत होते जे विभीषण म्हणायचे. खरं तर विभीषण आपल्या भावाला वाचवू इच्छित होते.

- Advertisement -

विभीषणाला लंकेतून हाकलले : विभीषणाने रावणाला पदोपदी समजविण्याचा प्रयत्न करून धर्म संगत शिकवले. तरीही रावणाने शेवटी संतापून विभीषणाला लंकेतून हाकलले. त्यांना सीमेच्या हद्दीपार केले. जर त्याने असे केले नसते तर कदाचित विभीषणाला सुद्धा लंकेत राहून रामाशी युद्ध करावे लागले असते.

रामाने विभीषणाला आश्रय दिला : रावणाने घरातून तसेच सीमेतून बाहेर काढल्यावर विभीषणाकडे वास्तव्यास कोणताही पर्याय नव्हता. ते श्रीरामाच्या आश्रयास गेले. विभीषणाला वाटत असे की लंकेचे कोणतेही निष्पाप लोकं या युद्धात मारले जाऊ नये आणि लंकेत न्यायाचे राज्य स्थापन होवो. विभीषण श्रीरामाच्या चरणी यासाठी गेले नव्हते की त्यांना श्रीरामाच्या मदतीने लंकेश बनायचे होते. त्यांचा हेतू वेगळाच होता. विभीषणाने शरणागत होण्याची विनवणी करीत असताना वानरराज सुग्रीवने त्याला शत्रूचा भाऊ आणि दुष्ट वृत्ती असे म्हणून भीती सांगितली. आणि त्याला बंदी करून शिक्षा देण्याची विनवणी केली. पण हनुमानाने त्यांना वाईट दुष्ट नसून शिष्ट सांगून त्यांना आश्रय देण्याची विनवणी केली. यावर श्रीरामाने कारणाला योग्य सांगितले आणि हनुमानाला म्हणाले की विभीषणाला आश्रय देणे तर ठीक आहेकाही काळ ते थांबले आणि म्हणाले की जो कोणी माझ्या शरणी येतो आणि म्हणतो की मी आपलाच आहे त्याला मी अभय देतो. हा माझा दास आहे या साठी विभीषणाला आश्रय दिले पाहिजे.

धर्माला समर्थन करणे आवश्यक आहे : बरेच लोकं म्हणतात की कुंभकर्णाने आपल्या भावाचा समर्थन करून आपल्या भावाच्या धर्माचे पालन केले, मेघनादने आपल्या वडिलांना साथ देऊन आपल्या मुलाच्या धर्माचे पालन केले, म्हणून लोकांना त्याच्यांसाठी सहानुभूती दिसून आली. पण विभीषणाने रामाला साथ देऊन ईश्वरीय धर्माचे पालन केले. या आध्यात्मिक जगात न कोणी कोणाचा भाऊ असे, न मुलगा, न आई वडील. आध्यात्मिक जगात ईश्वरच आपले सर्व काही आहे. त्यांचा कडून युद्ध लढणे हाच आपला धर्म आहे. खरा युद्ध हाच खरा धर्म आहे.

हेच कारण आहे की रावण, कुंभकर्ण, मेघनाद या सारखे अनेक योद्धा महान आणि सामर्थ्यवान होते. पण विभीषण काही नसून देखील सर्वकाही होते. कारण प्रभू श्रीरामाने विभीषणाला चिरंजीवी होण्याचे वर आणि आशीर्वाद दिले आहे.

ते सात चिरंजीवी मधून एक आहे. जे अजून पण अस्तित्वात आहे. विभीषणाला देखील हनुमानासारखे चिरंजीवी आहे आणि आजतायगत शरीराने जिवंत आहे. विभीषण धर्मज्ञानी आणि दिव्यदृष्टीचे व्यक्ती होते. अशाने सिद्ध होते की विभीषण ना तर घराचे भेदी होते आणि न ते लंकेचे द्रोही होते. ते तर प्रभू श्रीरामाचे सेवक असे.

- Advertisment -

ताज्या बातम्या