सुपा (वार्ताहर) – सुपा परिसरातील गावांना शनिवारी दुपारनंतर जोरदार वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस झाला. काल दुपारी तीननंतर सुपा परिसरात जोरदार वादळी वारे सुटले, त्याचसोबत विजेचा कडकडाटही होता. या पावसामुळे शेतीच्या मशागतीसाठी लाभ होणार आहे.
सुपा परिसरात दुपारी तीन वाजता जोरदार पावसास सुरवात झाली. यावेळी वार्याचा वेग खूप असल्याने झाडाच्या फांद्या मोडणे, घरांवरील पत्र्यांसोबत व कांद्या पिकावर झाकलेले प्लास्टिकचा कागद उडाल्याची माहिती अनेक ठिकाणाहून मिळाली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पावसाचे प्रमाण चांगले होते. हा पाऊस मान्सूनपूर्व असल्याने त्याचा शेतीच्या मशागातीसाठी फायदा होणार आहे. शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तसेच चालूवर्षी सरासरी पाऊस चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकर्यामधून समाधान व्यक्त होत आहे.