Saturday, April 27, 2024
Homeनगरपिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; चावा घेतल्याने 6 गायी, 3 शेळ्या व पाळीव कुत्रे...

पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; चावा घेतल्याने 6 गायी, 3 शेळ्या व पाळीव कुत्रे दगावली

कोंढवड | वार्ताहर

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तांदुळवाडी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून त्याने चावा घेतल्याने 6 शेतकर्‍यांच्या गायी, 3 शेळ्या व काही पाळीव कुत्रे दगावली आहे.

- Advertisement -

मे महिन्यात एका पिसाळलेल्या कुत्र्याने रात्रीच्या वेळी गावातील एका महिलेसह काही जनावरांना चावा घेतला होता. त्यानंतर पिसाळलेला कुत्रा मरण पावला. परंतु त्यानंतर गावातील दोन तीन गायी व कालवडी दगावल्या. त्यामुळे काही जनावरांना या कुत्र्याने चावा घेतल्याचे लक्षात आले. त्यावर नागरिकांनी उपचार देखील केले. परंतु गायी दगावण्याच्या संख्येत वाढ होत एकापाठोपाठ एक अशा आज मितीस सुमारे 6 गायी, 3 शेळ्या व पाळीव कुत्रे दगावल्याने शेतकर्‍यांना धास्ती घेतली आहे.

Cyclone Biporjoy : चक्रीवादळाचा जोर वाढला! राज्यातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

दरम्यान संबंधित पिसाळलेल्या कुत्र्याने नेमका किती जनावरांना चावा घेतला याची माहिती नसल्याने ज्या शेतकर्‍यांच्या जनावरांना जखम झाली असेल त्यांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. सदर आजार हा संसर्गजन्य नाही असे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. तांदुळवाडी येथे गायी दगावण्याच्या घटना झाल्याने संबंधित ठिकाणी आवश्यकतेनुसार लसीकरण करण्यात आले आहे. कुत्रा चावल्यानंतर 10 दिवसांनी जनावरांमध्ये लक्षणे दिसतात.

अर्थमंत्री सीतारामन यांच्या मुलीनं बांधली लग्नगाठ; जाणून घ्या कोण आहेत प्रतीक दोशी?

सदर आजार हा संसर्गजन्य नाही त्यामुळे शेतकर्‍यांनी काळजी करण्याचे कारण नाही. आजारी असलेल्या जनावरांना वेगळ्या ठिकाणी बांधणे, लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. बाधित जनावरांच्या दुधापासून कोणताही धोका नाही असे राहुरी तालुका पशुधन विकास अधिकारी शैलेश बन यांनी सांगितले आहे.तसेच टाकळीमिया पशू वैद्यकिय आधिकार्‍यांनी गावात येऊन अनेक जनावरांच्या गोठ्यांची पाहणी करून शेतकर्‍यांना आवश्यक त्या सुचना केल्या.

माहिती लपवून ठेवू नका तांदुळवाडी परिसरात गायींना पिसाळलेल्या कुत्रा चावल्यामुळे संसर्ग झाला असल्यास अशा जनावरांच्या मालकांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधावा. जेणेकरून पुढील उपाययोजना करता येईल. गायींना पिसाळलेल्याचा संसर्ग झाल्याची बाब लपवून ठेवू नये, तसेच मृत जनावरांची स्वत:ची काळजी घेऊन जमिनीत खोलवर खड्डा घेऊन पुरावे, असे आवाहन तांदुळवाडीचे सरपंच अमोल पेरणे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या