नाशिक | प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांचे रोजगार गेले. अनेक लहानमोठे उद्योग बंद झाले. मोठ्या आर्थिक अडचणीतून नागरिकांनी हे दिवस काढले. त्यामुळे लॉकडाऊन काळात आलेले भरमसाट लाईटबिल माफ करावे अशी मागणी आज प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आले. यावेळी दिव्यांग दिनाचे औचित्य साधून अनेक दिव्यांग बांधवांनीदेखील आंदोलनात सहभाग घेतला.