कुरणवाडीच्या विवाहितेचा वांबोरीत छळ

jalgaon-digital
2 Min Read

राहुरी (प्रतिनिधी) –

विवाह सोहळ्यात मानपान दिला नाही. तसेच माहेरहून एक लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सौ. वैशाली संदीप घुगरे

या विवाहित तरुणीचा सासरच्या लोकांकडून शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. याबाबत राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील विवाहितेचा पती, सासरा, सासू व मामासासरे या चारजणांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौ. वैशाली संदीप घुगरे (वय 25 वर्षे, रा. कुरणवाडी ता. राहुरी) या तरुणीचा विवाह वांबोरी येथील संदीप नामदेव घुगरे या तरुणाबरोबर तीन वर्षांपूर्वी झाला. सौ. वैशाली हिला लग्नानंतर एक वर्ष व्यवस्थित नांदविण्यात आले. मात्र, त्यानंतर सन 2017 पासून दि. 30 डिसेंबर 2019 पर्यंत वेळोवेळी तिचा सासरी विवाह समारंभात मानपान दिला नाही तसेच तिने माहेरहून एक लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तिला वेळोवेळी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिचा शारिरीक व मानसिक छळ करून तिला उपाशीपोटी ठेवले. त्यानंतर तिला घरातून हाकलून दिले. सासरच्या होणार्‍या त्रासाला कंटाळून अखेर तिने राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांसमक्ष कथन केला.

सौ. वैशाली संदीप घुगरे हिच्या फिर्यादीवरून आरोपी पती संदीप नामदेव घुगरे, सासरे नामदेव यशवंत घुगरे, सासू कांताबाई नामदेव घुगरे, मामा सासरे नामदेव सुदाम पंडित (सर्व रा. वांबोरी, ता. राहुरी) या चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आव्हाड करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *