अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
विठ्ठल..विठ्ठल..जय हरी असा जयघोष देत राज्यभरातुन येणार्या पायी दिंड्या विठुरायाच्या पंढरीत आज दाखल झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासुन वारीला कोरोनामुळे खंड पडला होता. आता या दोन वर्षाच्या खंडानंतर भक्त आपल्या विठ्ठल रूक्मिणीच्या भेटीसाठी आतुर झाला आहे. यामुळे या वर्षी पंढपुरात रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याची शक्यता आहे.
- Advertisement -
पंढरपुरचे विठ्ठल रूक्मिणी हे संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आषाढी एकादशीला आपल्या लाडक्या विठ्ठल रूक्मिणीला भेटाला राज्याच्या काणाकोपर्यातुन वारकरी पंढपुरात दाखल झाले आहे. संपुर्ण पंढरीत भक्तमय वातावरण तयार झाले आहे.