Friday, April 26, 2024
Homeनगरऑनलाईन स्वाध्याय योजनेत 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

ऑनलाईन स्वाध्याय योजनेत 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना लॉकडानच्या काळात राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय योजनेत

- Advertisement -

जिल्ह्यातील 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी सहभाीग नोंदविला आहे. चालू आठवड्यात नगर जिल्हा राज्यात अठरावा क्रमांक असून लवकरचा हा क्रमांक ओलांडून टॉपमध्ये येण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

करोनाच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून राज्य शासनाच्या शालेय विभागाने 3 नोव्हेंबर 2020 पासून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉटस्पच्या माध्यमातून स्वाध्याय (डिजीटल होम असेसमेंट योजना) उपक्रम सुरू केला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर एक लिंक दिली जाते.

त्यात आठवड्यासाठी बहुपर्यायी दहा प्रश्नांची प्रश्नावली देऊन ती विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतली जाते. विद्यार्थ्यांनी ती सोडवल्यानंतर लगेच त्यांना त्याचा निकालही ऑनलाईनच मिळतो. जिल्ह्यात पहिली ते बारावीचे एकूण 7 लाख 77 हजार 711 विद्यार्थी आहेत. त्यापैकी या स्वाध्याय योजनेसाठी 1 लाख 9 हजार 998 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू अशा तिन्ही माध्यमांमध्ये हे स्वाध्याय उपलब्ध आहेत.

राज्यातील सर्वच जिल्हे या उपक्रमात सहभागी असून प्रत्येक आठवड्यात जिल्ह्यांची क्रमवारी खाली-वर होते. सध्या एकोणीसावा आठवडा सुरू असून त्यात नगरचा राज्यात अठरावा क्रमांक आहे. राज्यात एकाच वेळी हा उपक्रम सुरू आहे. दर आठवड्याला कोणत्या जिल्ह्याचा क्रमांक कुठे आहे, याची क्रमवारी होते. सध्या या उपक्रमाचा 19 वा आठवडा सुरू आहे. या उपक्रमाच्या सुरूवातीला तिसर्‍या आठवड्यात नगरचा नाशिक विभागात प्रथम क्रमांक आला होता.

अशी आहे स्थिती

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी – 7 लाख 77 हजार 711

स्वाध्यायसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी – 1 लाख 9 हजार 998

स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी 92 हजार 78

तिसर्‍या आठवड्यात नगर तिसर्‍यास्थानावर

हा उपक्रम सुरू झाल्यावर तिसर्‍या आठवड्यात नगर जिल्ह्याने नाशिक विभागात पहिल्या क्रमांक मिळविण्याचा बहुमान मिळविला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा घरंगळ सुरू झाल्याने नगर 18 व्या स्थानावर फेकला गेला. मात्र, पुन्हा जोमाने या योजनेत कामगिरी करण्याचा निश्चिय शिक्षण विभागाने केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या