Wednesday, April 24, 2024
Homeनगरकांदा 21 हजारांवर

कांदा 21 हजारांवर

राहुरीत लाल कांद्याला 14 हजारांचा दर

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – परतीच्या पावसाचा मोठा फटका हा शेतमालावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. कांद्याच्या पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून तेजीत असणार्‍या कांद्याच्या दरांनी पुन्हा एकदा वेग पकडला आहे. सध्याच्या घडीला कांद्याचे दर 210 रुपये प्रति किलो इतक्यांवर पोहोचले आहेत. मंगळवारी एक किलो कांद्यासाठी 80 रुपये मोजावे लागत होते. हेच दर अवघ्या काही दिवसांत क्विंटलमागे थेट द्विशतकाच्या पुढे पोहोचले आहेत. राहुरी बाजार समितीत 25 गोण्यांना 2100 रूपयांचा तर 33 गोण्यांच्या वक्कलला 20100 रूपयांचा दर मिळाला आहे. हा दर राज्यात आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारातही कांद्याचे दर लक्षणीयरित्य वाढले आहेत. दैनंदिन जीवनात स्वयंपाकामध्ये, विविध पदार्थ बनवतेवेळी कांद्याचा सर्रास वापर केला जातो. पण, आता मात्र कांद्याचे हे वाढलेले दर सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लावणार असंच चित्र आहे. मुळात अनेकांच्या खर्चाची आखणीही या वाढीव दरांमुळे बिघडली आहे. राहुरी बाजार समितीत एकूण कांद्याची आवक 3,296 गोणी झाली. त्यात गावरान कांद्याची आवक 714 गोणी होती.  काल निघालेले भाव असे-कांदा नं.1 -15000 ते 21000, कांदा नं.2 – 7500 ते 14995, कांदा नं. 3 – 1000 ते 7495. कांदा गोल्टी- 7000 ते 10000.

- Advertisement -

बाजारभाव व गोणी पुढीलप्रमाणे-
25 गोणी-रु. 21000, 33 गोणी- रु. 20100, 13 गोणी -रु. 20001 ते 20500,14 गोणी- रु. 19501 ते 20000, 14 गोणी- रु. 19001 ते 19500, 68 गोणी- रु. 17501 ते 18000, 61 गोणी- रु. 15501 ते 16000, 76 गोणी – रु. 14501 ते 15000.
लाल कांदा आवक 2,582 गोणी झाली. त्यात कांदा नं.1 -10500 ते 14500, कांदा नं.2 – 5000 ते 10495, कांदा नं.3 – 1000 ते 4995
कांदा गोल्टी- 5000 ते 7000 रूपयांचा दर मिळाला. 18 गोणी कांद्याला 14001 ते 14500 रूपयांचा दर मिळाला.

कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या
दिवशीही बाजार समित्यांचे व्यवहार सुरु

मुंबई – राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या खरेदी-विक्रीची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. बाजारपेठेत शेतमालाची घटलेली आवक पाहता कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सुटट्यांमुळे बाजार समित्यांचे व्यवहार बंद राहिल्यास ग्राहक आणि शेतकरी यांची गैरसोय होऊ शकते म्हणून शेतकर्‍यांना कांदा, बटाटा, टोमॅटो सुट्टीच्या दिवशीही बाजार समितामध्ये घेऊन येता यावे यासाठी सुट्टीदिवशीही बाजारसमित्यांचे व्यवहार सुरू राहणार आहेत.
ज्या जिल्ह्यामंध्ये कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतमालाचे उत्पादन आणि आवक जास्त आहे अशा जिल्हयातील सर्व बाजार समित्यांनी आणि विशेषतः नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे व मुंबई या जिल्ह्यातील बाजार समित्यांनी शासकीय, सार्वजनिक आणि बाजार समित्यांच्या साप्ताहिक सुटट्यांच्या दिवशीही बाजार आवारे चालू ठेवावीत आणि शेतमाल उत्पादक शेतकरी/ व्यापारी आणि ग्राहक यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. असे पणन संचालनालयाच्या वतीने बाजार समित्यांना परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या